हर घर जल नल से जल हे ब्रिद वाक्य घेउन प्रत्येक गावात कोट्यावधी रुपये खर्चुन करण्यात आलेल्या महत्वकांक्षी जलजिवन मिशनच्या पाईपलाईन मधुन पाणीच येत नसल्यामुळे जलजिवन चे मिशन फेल होत असल्याचे म्हटण्याची वेळ आली आहे.
दोन वर्षापुर्वी टाकळी लघु मध्यम प्रकल्पातुन विहीर खदुन पाईपलाईनव्दाॅरे टाकळी व दासावाडी तांडा तर टाकळी शिवारातीलच टांगदरी भागातील तलावातुन जमालवाडी व तांड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन करण्यात आली होती. परंतु या पाईपलाईनमधुन या गावांना पाणीपुरवठाच झाला नसल्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहे.
संध्या लघु मध्यम प्रकल्प व इतर ठिकाणी मुबलक पाणी साठा उपलब्ध असताना देखिल नियोजनाअभावी ग्रामस्थांना दोन ते तिन आठवड्यापर्यंत नळ येण्याची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे पाणी असुन सुद्धा ग्रामस्थांना तहानलेले राहावे लागत आहे.
टाकळी लघु मध्यम प्रकल्पातुन जवळपास साढे तीन किलोमिटरची पाईपलाईन करुन गावात पाणी आणण्यात आले खरे परंतु टाकळी ते बोडखा राज्यमहामार्गावर नारखुडी नदीवर सूरू असलेल्या पुलाच्या कामाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाईपलाईन फुटली असताना ती जोडण्याची साधी तसदीही संबधितांनी घेतलेली नाही. त्यामुळे पाणी सुरू केले तरी फुटलेल्या पाईपल्ईनमुळे हे पाणी ग्रामस्थांची तहान भागवणार नाही. ही पाईपलाईन जोडुन तात्काळ ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थ पदाधिकारी म्हणतात
१) देव कांबळे (ग्रामविकास अधिकारी)
जलजिवन मिशनची पाईपलाईन फुटल्यामुळे त्याचे पाणी गावापर्यंत यत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यानुसार पाणी वाटपाचे नियोजन सूरू आहे.
२) अलिमोद्दीन शेख (ग्रामस्थ)
प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत असून दोन ते तीन आठवड्यादरम्यान नळांना पाणी येतो तोही अल्पप्रमाणात. आता वापरण्यासाठीही विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.










