April 20, 2026 7:12 am

शनिवारी रूपालीने स्वत: संपवलं… बुलढाणा हादरलं, प्रकरण काय?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदावर नोकरी करत असलेल्या तरुणाने लग्नाचे खोटे आमिष देऊन लग्नास नकार दिला. यामुळे एका 20 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 24 जानेवारी रोजी चिखली तालुक्यातील केळवद गावात उघडकीस आली. मृतक मुलीचे नाव रूपाली रामदास सरकटे असे आहे. तर तिला या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणाचे नाव तन्मय विजय गवई राहणार पाटोदा चिखली असे आहे.

 

तन्मय विजय गवई याचे दोन वर्षापासून रूपाली सोबत प्रेमसंबंध होते. तन्मयने रूपालीला मुख्य म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात ओढताना सतत संपर्कात राहावी म्हणून मोबाईल सुद्धा घेऊन दिला होता. याच मोबाईल वरून प्रेमाच्या गोष्टी आणि आयुष्यातील स्वप्न रंगवली जात होती. त्यांच्या भेटी सुद्धा यादरम्यान झाल्याचे कळते. तन्मय हा विद्युत सहाय्यक पदावर पुणे येथे नोकरीवर होता.

 

आपण उन्हाळ्यात लग्न करू असे खोटे आमिष त्याने रूपालीला दिले होते. मात्र 24 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता रूपाली तन्मय सोबत मोबाईलवर फोनवर अखेरची बोलत होती. तिची आई वडील शेतात कामावर गेले होते. तर तिचा भाऊ गौरव बुलढाणा येथे कामानिमित्त घराबाहेर पडला होता. यादरम्यान घरात कोणी नसताना रूपालीने आतून दरवाजा बंद करून घेतला आणि घरातीलच असलेल्या खिडकीच्या एका पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवून टाकली. यावेळेस याबाबत तिचे वडील रामदास यांना या सर्व बाबी फोनवरून सांगण्यात आले. तेव्हा तुमचा घराचा दरवाजा आतून बंद असून उघडत नाही. यामुळे तुम्ही लवकर घरी या, काहीतरी अनर्थ घडले याची चुणूक त्यांना लागताच रूपालीच्या आई-वडील घराकडे फिरले.

 

समोरील दरवाजा उघडत नसल्याने मागील दरवाजा उघडताच पोटचा गोळा असलेली रूपाली गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आली आणि ह्या वेळेस आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तन्मय मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!