April 20, 2026 1:02 am

*मुंबईत नवे वाहतूक नियम, 1 फेब्रुवारीपासून अनेक वाहनांना प्रवेशबंदी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई: मुंबईमधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत पीक आव्हरदरम्यान वाहनांच्या रांगा लागतात, यामुळे कोंडीसह अपघातांचं प्रमाणसुद्धा वाढतं. त्यामुळे उद्यापासून (1 February) मोठे वाहतूक बदल केले जाणार आहेत. ते वाहतूक बदल कसे असतील, कोणत्या वाहनांवर बंदी असणार आहे ही सर्व माहिती जाणून घ्या

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 फेब्रुवारीपासून दररोज सकाळी 8 ते 11 दरम्यान आणि सायंकाळी 5 पासून 9 वाजेपर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. वाढत्या वाहनांसोबत, वाढलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे शहरात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलं आहे. अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून वाहतूक कोंडी सोडवण्याचं उद्दिष्ट आहे.

दक्षिण मुंबईत कठोर निर्बंध

दक्षिण मुंबईमध्ये हे वाहतूक नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. लक्झरी बससह सर्व अवजड वाहनांवर सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 12 पर्यंत प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी दिली जाईल, तर इतर सर्व अवजड वाहने मध्यरात्री ते सकाळी 7 वाजेपर्यंतच शहरात प्रवेश करू शकतील.

इस्टर्न फ्रीवेवर 24 तास अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये बस आणि काही अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला वगळण्यात आलं आहे. यामध्ये भाजीपाला, दूधविक्रेते, ब्रेड, बेकरी पदार्थ, पिण्याचं पाणी, पेट्रोल, डिझेल, आणि इतर काही वाहनांना प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

त्याशिवाय दहिसरमधील श्रीकृष्णनगर मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी क्रॉस रोड 2 वर एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावरून प्रवसा करणाऱ्या वाहनचालकांना क्रॉस रोड 3चा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या सर्व वाहतूक बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर प्रवास करण्यासाठी पडावं असं अवाहान केलं आहे. या बदलांमुळे येत्या काही दिवसांतच मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!