77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या आणि राज्य महोत्सव म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर चित्ररथ आधारलेला आहे. गणेशोत्सव आज असंख्य लोकांना आत्मनिर्भर बनवत आहे. यावरूनच गणेशोत्सव- आत्मनिर्भरतेचे प्रतिक ही संकल्पना चित्ररथातून सादर केली जाणार आहे.
लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र येण्यासाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. गणेशोत्सवचे स्वरुप दिवसेंदिवस मोठे होत चालले आहे. मुंबईसह राज्यातील असंख्य मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मूर्तीकार, सजावट करणाऱ्यांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून तयार होणारी आर्थिक साखळी हा चित्ररथाचा मुख्य विषय असणार आहे. या राज्य महोत्सवाने आत्मनिर्भरतेला कशी चालना मिळते हे मांडले जाणार आहे.
या वर्षीच्या परेडमध्ये 30 चित्ररथ असणार आहेत. 17 राज्ये आणि 13 केंद्र सरकारच्या विभागातील चित्ररथाचा यामध्ये समावेश आहे. स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत ही यावर्षाची थीम आहे. चित्ररथ कोणत्या राज्याचा सहभागी होणार यासाठी एक समिती निर्णय घेते. यामध्ये कलाकार, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते सामिल असतात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून राज्यांच्या चित्ररथांना परेडमध्ये समाविष्ट केले जाते.
महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू आणि काश्मीर, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश
हवाई दल मुख्यालय
आयुष मंत्रालय
लष्करी व्यवहार विभाग
सांस्कृतिक मंत्रालय
नौदल मुख्यालय
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग
गृह मंत्रालय (एनडीएमए-एनडीआरएफ)
गृह मंत्रालय (बीपीआरडी)गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (सीपीडब्ल्यूडी)ऊर्जा मंत्रालयमाहिती आणि प्रसारण मंत्रालयपंचायत राज मंत्रालय
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय











