April 23, 2026 10:33 pm

*लातूरच्या आंबेडकर चौकात आमदार अमित देशमुखांसमोर हत्येचा थरार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लातूर शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मित्रानेच जुनी कुरापत उरकून काढत मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका मित्राने दुसऱ्या मित्राला चाकूने भोसकून भर रस्त्यात खून केला आहे.

लातूर शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहेत. निवडणुकीच्या काळात लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख प्रचार सभा संपवून त्यांच्या मूळ गावी म्हणजे बाभळगाव निघाले असताना खुनाची घटना नुकतीच घडली होती, ते आयत्यावेळी त्या ठिकाणी आल्याने पोलिसांना तात्काळ त्यांनी सूचना दिल्या. त्यांच्यासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदेला रिक्षात बसून त्याच्या मित्रांनी लातूरच्या स्वरूपच्या रुग्णालयामध्ये दाखल केले उपचार दरम्यान प्रज्वल शिंदे याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.

‘बऱ्याच दिवसापासून तू माझ्या डोक्यात बसलास..’

लय दिवसापासून तू मझ्या डोक्यात बसलास, असे म्हणत २९ वर्षीय तरुणावर त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने छातीत, बरगडीत, पोटात आणि मानेवर चाकूने भोसकून खुन केल्याचा प्रकार रात्री उशिरा समोर आला आहे. एकामागे एक वर्मी घाव बसल्यानंतर जमिनीवर कोसळलेल्या तरुणाची अवस्था बघुन ‘गोट्याची विकेट पडली, पळ…’ असे म्हणत फरार झालेल्या दोघांना पहाटे २.३० वाजता अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झाला तेव्हा हे दोनही आरोपी नशेत असावेत अशी माहिती समोर आली आहे.

शहरातील बौद्धनगर येथे राहणारे आणि व्यवसायाने मजूर असलेले प्रज्वल उर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) हा आपला चुलत भाऊ आतिश बाबासाहेब मस्के (वय २३) याच्या सोबत रात्री ११ वाजेच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाइफ लाईन हॉस्पिटलसमोर थांबला होता. यावेळी आंबेडकर चौक – परिसरात ओळखीचे गणेश सुरेश गायकवाड आणि भिमा सूर्यवंशी हे दोघेही तिथे आले. त्यातील गणेश गायकवाड याने मोठ्याने आवाज देत प्रज्वल मस्के याला बोलावून घेतले. प्रज्वल मस्के त्यांच्याकडे जाताच त्यांच्यात जुना बाद उफाळून आला. वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले आणि लगेचच शिवीगाळ सुरू झाली. ‘तू मला लई दिवसांपासून डोक्यात बसलास, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,’ अशी धमकी देत गणेश गायकवाड याने आपल्या कमरेला असलेला धारदार चाकू काढून प्रज्वल मस्के याच्यावर वार केला.

चुलत भावाने सगळं सांगितलं

दरम्यान, भिमा सूर्यवंशी याने आतिश मस्केला धक्का देत बाजूला ढकलले आणि त्यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, मात्र त्यांनी कशीबशी सुटका करुन पळ काढला. आरोपींनी प्रज्वल मस्के याच्यावर पोटात व छातीवर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, त्याला तत्काळ शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतिश मस्के याच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिसांत गणेश सुरेश गायकवाड आणि भिमा सूर्यवंशी (दोघे रा. आनंद नगर, लातूर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खुनाचे प्लॅनिंग झाले कसे?

“आज एकाचा बर्थडे आहे असे आरोपीने दुपारीच मित्रांना सांगितले होते. आम्ही रात्री बॅनर तयार करण्यासाठी आंबेडकर चौकात आलो होतो. तेथे आमच्याच परिसरातील विकास गायकवाड याला कोणीतरी मारहाण केल्यामुळे त्याला चौकातील लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेल्याचे समजले, म्हणून तिथे थांबलो. त्याच वेळी बाजुच्या पान टपरीच्या मागे दोन्ही आरोपी थांबले होते. त्यांनी गोट्याला बोलावून घेतले. तो एकटाच तिकडे गेला आणि त्यांची बाचाबाची झाली. जोरजोरात आवाज येत असल्यामुळे आम्ही तेथे पोचलो तर एकाच्या हातात कोयता आणि दुसऱ्याच्या हातात सुरा होता. आरोपी गोट्याच्या पोटात आणि छातीत सुरा खुपसत होते. गोट्या खाली पडल्यावर ‘गोट्याची विकेट पडली पळ आता….’ असे आरोपी एकमेकांना बोलले आणि तेथून पळून गेले. त्याच्या छातीतच चाकू लागला असेल म्हणून मी छातीला दाबून धरलो परंतु नंतर कळाले की त्याच्या पोटातूनही रक्त येत होते. गोट्या आधी राजकारणात पदाधिकारी होता. त्याचाही राग आरोपींच्या मनात होता म्हणूनही कदाचीत त्याला मारले असावे”, असे त्याच्या भावाने सांगितले आहे.

अमित देशमुखांनी गाडी थांबवली

“जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महापूर येथील प्रचार सभा आटपून बाभळगावकडे परतत होते. रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना, त्यांना एका तरुणावर चाकूने हल्ला होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गाडी थांबवताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलला पाहून त्यांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि डॉक्टरांशी बोलून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, पोलीस यंत्रणेला घटनास्थळी पाचारण केले. “अशी माहिती अण्णाराव खोडेवाड, सहायक पोलीस निरिक्षक तथा तपास अधीकारी, लातूर यांनी दिली आहे.

काँग्रेसकडून पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले निवेदन

लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने सीमा ओलांडली असून, सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील निवेदन लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!