April 20, 2026 12:46 am

समीर वानखेडे यांना मोठा धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

माजी एनसीबी अधिकारी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आयन खान याच्या ‘द बार्ड्स ऑफ बॉलिवूड’या नेटफ्लिक्स सीरिजविरोधात वानखेडे यांनी दाखल केलेला २ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा न्यायालयानं गुरुवारी फेटाळून लावलाय.

नेमकं प्रकरण काय?

आर्यन खाननं दिग्दर्शित केलेल्या या वेब सीरिजमध्ये एका पात्राचं चित्रण हे समीर वानखेडे यांच्याशी मिळतेजुळते असल्याचा दावा वानखेडे यांनी केला होता. या चित्रणामुळं त्यांची प्रतिमा मलिन होत असून, तपासा यंत्रणांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. वानखेडे यांनी या सीरिजमधील काही दृश्ये हटवण्याची आणि २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. ही रक्कम ते टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला दान करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

न्यायालयानं याचिका फेटाळली

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, समीर वानखेडे हे मुंबईचे रहिवासी आहेत आणि या सीरिजची निर्मिती करणारी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ही कंपनी देखील मुंबईतच आहे. त्यामुळं या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होऊ शकत नाही.न्यायालयानं वानखेडे यांची याचिका फेटाळताना त्यांना ‘योग्य न्यायालयात’ म्हणजेच मुंबईत दाद मागण्याची मुभा दिली आहे.

आर्यन खान आणि वानखेडे वाद

२०२१ मध्ये मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती. मात्र, नंतर पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर वानखेडे यांच्यावरच खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिल्याच सीरिजवरून हा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळं आर्यन खान आणि नेटफ्लिक्सला मोठा दिलासा मिळाला असून, समीर वानखेडे मुंबई कोर्टात याचिका दाखल करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!