April 23, 2026 9:16 pm

आसाम दौऱ्यात PM नरेंद्र मोदींची कॉंग्रेसवर टीका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

काँग्रेसने मतांसाठी ईशान्येकडील राज्यांतील जमीन घुसखोरांकडे सोपवल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या निवडणुकीच्या तोंडावर आसामच्या दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सभेला संबोधित केले.

राज्यात गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसच्या राजवटीत घुसखोरी वाढतच राहिली आहे. बेकायदा घुसखोर जंगल, प्राण्यांचे मार्ग आणि पारंपरिक संस्थांवर कब्जा करीत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

‘भारतीय जनता पक्षाचे येथील सरकार जमिनींवर अतिक्रमण केलेल्या घुसखोरांना हुसकावून लावून आसामची ओळख आणि संस्कृती याचे संरक्षण करीत आहे,’ असेही प्रंतप्रधान मोदी म्हणाले. ‘घुसखोर येथील लोकसंख्याशास्त्रीय संतुलन बिघडवत आहेत, संस्कृतीवर हल्ला करून येथील गरीब आणि युवकांच्या नोकऱ्या बळकावत आहेत.

 

घुसखोरांना संरक्षण देऊन सत्ता मिळवणे, हे काँग्रेसचे एकमेव धोरण असल्याने येथील नागरिकांनी काँग्रेसपासून सावध राहावे,’ असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देशभरात हाच दृष्टिकोन ठेवून काम करीत आहेत. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतही त्यांनी घुसखोरांना वाचवण्यासाठी मोर्चे आणि रॅलींचे आयोजन केले होते. परंतु तेथील लोकांनी त्यांनी पूर्णपणे नाकारले. आसाममधील जनताही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. काँग्रेसने नकारात्मक राजकारणाचा संदेश देऊन नागरिकांचा विश्वास गमावला आहे. भारतीय जनता पक्ष हीच देशातील नागरिकांची पहिली पसंती आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

 

विकासातील मैलाचा दगड गाठले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी करून आसामच्या विकासाच्या प्रवासातील मैलाचा दगड गाठला आहे, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्वशर्मा यांनी रविवारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कालियाबोर-नुमालीगड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१५च्या सेक्शनच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी दोन अमृत भारत एक्स्प्रेस गाड्यांचेही व्हर्चुअली उद्धाटन केले. त्या वेळी मुख्यमंत्री हिमांत बिस्वशर्मा बोलत होते.

 

तृणमूलचे सरकार देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे

सिंगूर : ‘मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरांना मदत करण्याकरिता तृणमूल काँग्रेसचे सरकार देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. ‘पश्चिम बंगालमध्ये सुशासन आणि विकास यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी; तसेच गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी येथील महाजंगलराज संपवणे आवश्यक आहे,’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील हुगळी जिल्ह्यातील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. ‘तृणमूल काँग्रेसने भूसंपादनाविरुद्ध सन २००८मध्ये केलेल्या आंदोलनामुळे टाटा मोटर्सला आपला नॅनो कारचा प्रकल्प मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे हे ठिकाण बंगालच्या राजकीय स्मृतींमध्ये कोरले गेले आहे,’ असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!