April 23, 2026 11:59 pm

कोल्हापुरात आमदाराच्या लेकाने बाजी मारली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्याच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत यंदा ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लावत भाजप-शिंदेसेना महायुती आपला झेंडा फडकवणार असं चित्र आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर, कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 7 डमधून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय झाला आहे. शिंदेसेनेकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर, त्यांच्या विरोधात अपक्ष विजय साळोखे हे रिंगणात होते. मात्र, या निवडणुकीत आमदार पुत्राने विजय मिळवला आहे.

 

आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ड मधील चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. माजी नगरसेवक विजय साळोखे यांच्याविरोधात ही लढत जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली होती. पारंपरिक राजकारण आणि स्थानिक संपर्काच्या जोरावर ऋतुराज यांनी सोशल मीडिया क्रेझला ठेंगा देऊन आपला गड राखला आहे.

प्रभाग क्रमांक 7 ड ही निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत ठरली. अपक्ष उमेदवार विजय साळोखे यांनी ‘नो मेवा, ओन्ली सेवा’ ही प्रचार टॅगलाईन घेऊन इन्स्टाग्रामसह डिजिटल माध्यमांवर जबरदस्त वातावरण तयार केले होते. साळोखे यांच्या सोशल मीडिया क्रेझमुळे त्यांचा विजय निश्चित वाटत असला तरी मतदारांनी ऋतुराज क्षीरसागर यांना प्राधान्य दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या संघटित प्रचार, घराघरांतल्या संपर्काने आणि पारंपरिक मतदारसंघाच्या विश्वासाने ऋतुराज यांनी विजय खेचला. या निकालाने प्रत्यक्ष मैदानातील कामच निर्णायक ठरते, हे पुन्हा सिद्ध झाले.

एकूण 81 जागांच्या या निवडणुकीत महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) ने बहुमताकडे वाटचाल सुरू केली असली तरी काँग्रेसनेही काही प्रभागांत वर्चस्व राखले आहे. ऋतुराज क्षीरसागर यांच्या विजयाने सोशल मीडिया प्रचारापेक्षा संघटनात्मक शक्ती आणि स्थानिक पातळीवरील काम महत्त्वाचे असते, हे अधोरेखित झाले आहे. ऋतुराज यांच्या या विजयाने क्षीरसागर कुटुंबाची कोल्हापूर राजकारणातील पकड मजबूत झाली असून पुढील सत्ता समीकरणावर नजर राहणार आहे.

या विजयाबरोबरच कोल्हापूर महापालिकेतील इतर प्रभागांतही रोमांचक निकाल समोर आले आहेत. कोल्हापुरात दुपारी दोन वाजेपर्यंत भाजपाने 19, शिवसेनेने 14, अजितदादांच्या राष्ट्रवादीने 3, काँग्रेसने 24, शिवसेना उबाठा पक्षाने 1 जागेवर विजय मिळवला आहे तर 1 इतर जागा निवडून आली आहेत. एकूणच महायुतीचं पारडं कोल्हापुरात जड दिसत आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!