May 15, 2026 3:51 am

लग्नावरून परतताना रस्त्यात अडवलं, अपहरण करून दोघींवर ८ ते ९ जणांनी केला सामूहिक बलात्कार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सुरगुजा जिल्ह्यात लग्न समारंभ आटपून परत घरी निघालेल्या दोन अल्पवयीन मुलींवर ८ ते ९ जणांनी सामूहिक बलात्कार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी एकाच गावातील चार अल्पवयीन मुली जवळच्या वस्तीत एका लग्नसमारंभाला गेल्या होत्या. रात्री सुमारे १० वाजता त्या घरी परतत असताना, एका ठिकाणी ८ ते १० तरुणांनी त्यांना अडवले. काही जण सायकल तर काही दुचाकींवरून आले होते. सुरुवातीला त्यांनी मुलींचा विनयभंग केला आणि त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात आली.

या दरम्यान, एक मुलगी धाडसाने पळून जाण्यात यशस्वी झाली, तर दुसरीनेही प्रसंगावधान राखून निसटण्यास यश मिळवले. मात्र, उर्वरित दोन मुलींना आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेले. एका मुलीला गावापासून दूर असलेल्या मैदानात नेऊन चार जणांनी सामूहिक अत्याचार केला, तर दुसऱ्या मुलीवर गावातील परिसरातच तीन जणांनी अत्याचार केल्याची माहिती आहे.

पहाटे सुमारे २ वाजता दोन्ही पीडित मुली घरी परतल्या, मात्र भीतीमुळे त्यांनी कुटुंबीयांना काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी एका मुलीने आईसोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी प्रियांशु खालखो, आशिष, राहुल आणि इतरांविरुद्ध बीएनएसच्या कलम ७०(२) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ४(२), ५(जी) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!